गुरुवार, २७ मे, २०२१

NET/ SET in Social Work in Marathi ( NET/ SET समाजकार्य मार्गदर्शन मालिका भाग १ )

  नमस्कार मित्रांनो ,

                    26 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येणाऱ्या SET परीक्षेबाबत ची सूचना https://setexam.unipune.ac.in या website वर उपलब्ध झाली आहे . या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत  10 जून 2021 आहे .

परीक्षेची योजना

अ) SET परीक्षा ऑब्जेक्टिव्ह मोडमध्ये घेण्यात येईल. चाचणीमध्ये दोन पेपर असतील. दोन्ही पेपर फक्त वस्तुनिष्ठ ( बहुपर्यायी ) प्रश्न असतील आणि परीक्षा दिवशी दोन वेगवेगळ्या सत्रात परंतु  break न घेता     आयोजित केली जाईल:




सत्र   पेपर               बहुपर्यायी               गुण                                   कालावधी       



                           

प्रथम     I                 अनिवार्य 50           50 x 2 =100 1 तास (सकाळी 9.00 ते सकाळी 11.00)




द्वितीय II 100 अनिवार्य .                         100 x 2 = 200      2 तास (सकाळी 11.30 ते रात्री 01.30)



पेपर I :

पेपर I म्हणजे  शिक्षकी अभियोग्यता आणि संशोधन वृत्ती ची  चाचणी  , यात शिक्षकी अभियोग्यतेवर आधारित प्रश्न विचारले जातात यात प्रमुक्ळ्याने अध्ययन आणि अध्यापन या विषयी प्रश्न असतात , संधोधन वृत्ती वर प्रश्न असतात , चालू घडमोडी,  अंकगणित आणि सामान्य ज्ञान यावरही प्रश्न असतात या पेपर मध्ये अनेक विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स मिळतात कारण या विषयची तयारी त्यांनी योग्य प्रकारे केलेली नसते , खरेतर यात चागले गुण मिळण्याची संधी आहे आणि नेमके या पेपर मध्ये कमी गुण मिळाल्याने पेपर 2 मध्ये चांगले गुण मिळूनही सरासरी मेरीट मध्ये येण्याची संधी हुकते आणि १-2 मार्कांनी SET ची पात्रता परीक्षा राहून जाते. पेपर I करता माझ्या अनुभवानुसार सर्वाधिक उपयुक्त पुस्तक म्हणजे विद्या भारती प्रकाशनाचे NET-SET मार्गदर्शक पुढील लिंक वर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता   

हे पुस्तक पेपर I साठी अतिशय उपयुक्त आहे ,पेपर I मध्ये विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या घटकावर आधारित प्रश्न उपलब्ध आहेत.

सोमवार, १७ मे, २०२१

Lets Speak English - Listening Skill blog 2

                     ज्यांनी   Lets Speak English च्या Series अंतर्गत पहिला blog वाचला, story ऐकली आणि स्वत: ची Listening skill वाढवली आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली अश्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन . आज  Lets Speak  English अंतर्गत Listening Skill  वर blog 2 प्रकाशित करत आहे . प्रत्येक skill म्हणजे Listening-Speaking-Reading- Writing साठी  10  लेख blog प्रकाशित करणार आहे त्यामुळे ज्यांनी पहिला blog वाचला  नसेल त्यांनी सर्वप्रथम   https://bhushanrajput.blogspot.com/2021/05/lets-speak-in-english.html    वर click करावी आणि पहिला blog वाचवा . आजच्या blog मध्ये आपण Listening skill  वरच भर देणार आहोत , आजच्या blog   मध्ये   मागच्या episode  दिलेली story पुढे नेत आहोत.



आज खाली दिलेल्या Link  वर click करा आणि story  ऐका आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या 

                       https://www.spreaker.com/episode/44869598



Fill in the blanks with correct words

1. Ramesh allows .................. to come with him.

2. The forest on the outskirt of the village was ....................

3. Rima find the direction in the dark forest because of ................... alphabets on the T-shirt of golu.

4. The Banyan tree was ............................

5. Ramesh lights the...........................


गुरुवार, १३ मे, २०२१

Lets speak in English

 Good morning All,

                         I am really happy with your responses, It shows that I have chosen the right topic. Let's get started.....

  • कोणतीही भाषा शिकण्यासाठी  4  कौशल्यांची गरज असते .
  • हि 4 कौशल्य क्रमानुसार शिकावे लागतात 1. LISTENIG 2. SPEAKING 3. READING 4. WRITING
  • ENGLISH भाषा शिकताना आपला हा क्रम चुकतो कारण आपण सुरवात वाचण्या पासून करतो , फक्त A-Z alphbets  आपण एकतो आणि नंतर बोलतो मात्र जेव्हा वाक्य बोलण्याची वेल येते तेव्हा आपण वाचन करतो .
  • ENGLISH भाषा बोलता न येण्याचे कारण म्हणजे आपण ENGLISH भाषेत जास्त काही ऐकत (listen) नाही .
  • ENGLISH भाषेत जास्त काही न ऐकल्यामुळे,आपल्याला ते या भाषेच उच्चार आणि वाक्याचे प्रकार कळत नाहीत . उदा. आपण मराठी किंवा अहिराणी किंवा आपली मातृभाषा लहानपणापासुन ऐकत असतो त्यामुळे विविध वाक्य, बोलण्याची तऱ्हा म्हजे आरोह-अवरोह, चेहऱ्यावरील हावभाव यांचे आपण निरीक्षण करत असतो त्यामुळे जेव्हा आपण एखादे वाक्य बोलतो तर ते आपण ऐकलेल्या वाक्यांची पुनरावृत्ती असते, त्यावेळी अआप्न grammar चा विचार करत नाही.
  • ENGLISH  हि आपली मातृभाषा नाही त्यामुळे ENGLISH  भाषेतील वाक्य आपल्या कानावर पडत नाहीत आणि आपण ENGLISH  बोलण्यात कमी पडतो,
  • या Blog वर visit करणारे सर्व वाचक किमान  हे 12 वी उत्तीर्ण  आहेत व त्यांना grammar ची ओळख आहे हे गृहीत धरून आपण English  भाषेत बोलणे शिकणार आहोत .
  • या पद्धतीचा क्रम भाषा शास्त्राच्या  नियमानुसार आहे म्हणजेच 1. LISTENIG 2. SPEAKING 3. READING 4. WRITING
  • या क्रमानुसार आपण सराव करून घेणार आहोत  सुरवातीला प्रत्येक कौशल्याचे 10  वेळा सराव करणार आहोत .
  • 10 वेळा सराव म्हणजे 10 post  प्रत्येक कौशल्यावर असतील , तसेच तुम्हाला या कौशल्याच्या सरावासाठी किमान 5-10 मिनिट्स द्यावे लागतील 
आज अक्षय तृतीया आहे आणि तुमच्या जीवनात अक्षय असणारे एक गोष्ट असते ती म्हणजे ज्ञान , तर चला आज आपण Listening Skill शिकुया, चांगला श्रोता चांगला वक्ता असतो ,म्हणून आज मी तुम्हाला English भाषेतील एक short sotry सांगणार आहे 


Story ऐकण्यासाठी लिंक खाली देत आहे

                           https://www.spreaker.com/show/bhushan-rajputs-podcast

या लिंक वर तुम्हाला ऐकता येईल 



 सर्वांनी Story ऐकली असेलच  आता वेळआहे तुम्ही किती मनापासुन story ऐकली आहे ते तपासण्याची 

खाली दिलेल्या रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचे आहेत. तुम्ही तुमची उत्तरे comment BOX मध्ये type  करू शकता 

Assignment 1: complete the sentece with correct word

1. Once there was a village called ...............................

2.Rima was a cute girl studying in the ....................... class.

3.Rima thought the............................. must be the friend of her father.

4. Ramesh gave ..................... to Ramesh.

5. Sujata was .............................. of Dinesh.

solve the above questions and answer in the comment box.

English-Marathi-English ( चला English मध्ये बोलुया ) (Lets speak in English)

 नमस्कार मित्रांनो ,

मी मागील ७ वर्षापासुन English या विषयाचे अध्यापन करत आहे, या दरम्यान मी जे अनुभवले त्या वरून मी  English  शिकवण्याची व शिकण्याची वेगळी  पद्धत  मी वापरणार आहे ,ही वेगळी पद्धत माझ्या अनुभवातुन तयार केली आहे. विद्यार्थ्यांना मध्ये  English ची भीती असण्याचे मुख्य 2 कारणे पुढील प्रमाणे 

  1. विद्यार्थ्यांना English Grammar चे सर्व नियम माहिती असतात मात्र त्यांना Sentence तयार करता येत नाही उदा.  Subject + Verb1 + Object हे सूत्र Simple Present tense चे आहे हे माहिती असते मात्र ते 2-4   sentence पेक्षा जास्त वाक्य तयार करू शकत नाहीत ,आणि हि 2-4 वाक्य पुढील प्रमाणे असतात .  
  •       I am a boy 
  •       She is a teacher.
  •     He is a sport person
  • They are policemen.            
 2.   विद्यार्थी दैनंदिन जीवनात  English भाषेतील अनेक शब्द वापरतात मात्र त्या English शब्दांचा वाक्यात उपयोग करू शकत नाहीत .

उदा. Bike, Electricity, Motor, Car, Driving, Swap, Break, Visit, Show, Programme, Rally, Application, writing, Book, Chatting, Observe, Entry, exit, speaker, gift, Suddenly , accident , hotel, Restaurant , Theater, Ticket, Bridge, share  या सारखे अनेक शब्द आपण दैनंदिन जीवनात वापरत असतोच म्हणजेच दैनंदिन जीवनात वापरत येणारे अनेक शब्द English  असतात आणि आपण ते सहज वापरतो, बरोबर ना? परंतु हेच शब्द English वाक्यात वापरायला सांगितले तर......



वर दिलेल्या GIF सारखी प्रतिक्रिया असते, फसलो मी आता 😱😱😱 कारण आपल्याला English Grammar चे नियम माहिती असतात मात्र ते आपण कधी वापरत नाही, परीक्षा झाली कि विसरून जातो  कि आपण English Grammar शिकलो आहोत. 

मला सांगा कि एका माणसाने नवीन कार विकत घेतली आणि कार कशी चालवायची याचे पुस्तक विकत घेतले आणि सर्व नियम पाठ केले  आणि त्याने कार चालवायला सुरवात केली तर काय होईल ?


 जे वरच्या चित्रात दिसत आहे तेच आपल होत आपण नियम वाचतो मात्र ते वापरत नाहीत जसे कि कार चालवायची सगळी माहिती आहे मात्र कार कधीच चालवली नाही ,तसच grammar माहिती आहे मात्र English बोलतांना भीती वाटते, काहीच आठवत नाही,नियम विसरतो, शब्द सुचत नाहीत मग 30 दिवसात Soken English शिकवणारे class तुम्ही join करता तेथे जाऊन पुन्हा English Grammar शिकता ,तुम्हाला नियम पाठ करायला सांगितले जाते आणि पाचवीला शिकलेले वाक्य पुन्हा शिकवले जातात I am a boy, I eat a apple, She sing a song , etc..........


आपली प्रतिक्रिया हीच असते काहीतरी नवीन सांगा जे मला माहित नाही ,कारण  आपला उद्देश English बोलन असतो ,grammar शिकणे नाही. grammar महत्वाचे नाही असे मी म्हणत नाहीये.

एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले तर तुम्हाला मी काय सांगु इच्छितो ते कळेल.

प्रश्न : तुम्ही मराठी भाषेचे व्याकरण (grammar) अगोदर शिकलात कि मराठी भाषा अगोदर बोललात ?

विचार करा जर आपण आपण मराठी भाषा किंवा आपली मातृभाषा व्याकरण माहिती नसताना बोलू शकतो तर English का नाही?

या वर विचार करा , तुमचे प्रश्न मला  comment box मध्ये टाका ,English बोलणे शिकायचे असेल तर blog follow करा म्हणजे तुम्हाला या विषयावरील post चे notification येईल . माझा विश्वास आहे कि या नवीन पद्धतीने तुम्ही English मध्ये नक्कीच बोलता येईल 

भेटूया पुढच्या blog मध्ये तो पर्यंत स्वत: ची काळजी घ्या ,कोरोना पासून दुर राहा 👍👍👍👍







सोमवार, १० मे, २०२१

10,000 तास सिद्धांत

10,000 तास यशप्राप्तीचे ....... 

Gladwell's च्या  Outliers: The Story of Success, या पुस्तकात 10,000 तास यशासाठी हि संकल्पना मांडली आहे , या संकल्पनेवर बरीच चर्चा झाली आहे काहीना हि संकल्पना  उथळ  व निरर्थक वाटते तर काहीना हि संकल्पना प्रभावी व जीवन बदलण्यास सक्षम आहे असे वाटते  .

या संकल्पनेचा मुळ पाया हा आहे कि एखादे कौशल्य आत्मसात करण्यासाठी नियमित पूर्ण समर्पण देऊन 10,000 तास सराव किंवा अभ्यास केल्यास व्यक्ती त्य कौशल्यात पारंगत ,निष्णात होतो. वरवर पाहत 10 हजार तास हे खूप सहज सोप वाटत मात्र या साठी सातत्य आणि लक्ष न भटकू देता एकाग्रतेने सराव किंवा अभ्यास करणे अपेक्षित असते ,आणि प्रक्रिया दीर्घकाळ चालते कारण आपण दैनंदिन जीवनातील 24 तासापैकी  सरासरी 8 तास झोप, 6 तास शाळा किंवा  कॉलेज यासाठी  देतो , 2 तास जेवण वैगरे यासाठी  देतो उरतात  8 तास यातही काही आवश्यक कामे असतात, TV पाहणे,खेळणे ,अभ्यास करणे या सारख्या अनेक गोष्टींवर खर्च  करतो त्यामुळे दिवसाला सरासरी 8 ताससुद्धा उरत नाहीत  मात्र  या संकल्पनेत दिवसाला 8  तुम्ही ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी किंवा तुमच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असे अपेक्षित आहे आणि बंधनकारक आहे ,कारण या पेक्षा कमी वेळ दिल्यास खूप दीर्घ कालावधी लागु शकतो . खालील चित्रात तुम्हाला 10 हजार तासाचे नियोजन मांडले आहे.



   वरील चित्रावर एक दृष्टीक्षेप टाकला तरी आपल्याला या प्रक्रियेचे गांभीर्य कळते ,तुम्ही महेंद्रसिंग धोनी चे एक वाक्य असले असेल त्यात तो म्हणतो कि ध्येय गाठण्यासाठी प्रकियेवर लक्ष दिले गेले पाहिजे 

   कारण आपण  कितीही पर्यंत  वेगाने धावलो किंवा लढलो किंवा अभ्यास केला पण  
आपण जिंकलो नाही किंवा निश्चित केलेले ध्येय पूर्ण झाले  नाही तर आपण केलेले सर्व प्रयत्न  व्यर्थ ठरतात , त्यामुळे ध्येय निश्चित  करताना  विचार पूर्वक करा,उगाचच कोणाच्या तरी प्रभावात येऊन ध्येय निश्चित करणे मूर्ख ठरतो ,ध्येय निश्चित करताना स्व: तची आवड ,अभिवृत्ती , दृष्टीकोन आणि आर्थिक सामाजिक परिस्थितीचा विचार निश्चित करावा. कारण दररोज 8 तास अभ्यास किंवा  सराव केला तरी 5.5 वर्ष लागतात  ,दहा हजार तास पूर्ण करण्यासाठी .

5.5 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे, तुम्ही खेळाडू असाल आणि तुम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये  सहभाग घ्यायचा आहे तर तुम्हाला खूप मेहनत घेणे आवश्यक आहे , अनेक खेळाडू हे प्रतिभाशाली असतात त्यांच्यात गुणवत्ता असते असे खेळाडू सहज नाव कमावतात मात्र काही खेळाडू असेही आहेत जे कठीण परिश्रम करतात आणि जग विख्यात होतात,प्रतीभ्शाली खेळाडूंना सुद्धा सर्वाची गरज असते.

            MPSC,UPSC आणि इतर सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते ,पोलीस भरतीचेच उदाहरण घ्या, १ जागेसाठी 4 हजार ते ५ हजार उमेदवार असतात. तुम्ही 12 वी उत्तीर्ण झाल्यावर ध्येय निश्चित केले आणि 10 हजार तास हि पद्धत वापरली तरी तुम्ही निश्चितच यश मिळवू शकतात वर्ग १ च्या पदासाठी निवड होऊ शकते जर ध्येय निश्चित करण्यात उशीर झाला तर हा कालावधी अजून वाढू शकतो . 10 हजार तास  अभ्यास तो हि एकाग्रतेने केल्यास यश निश्चित आहे, आणि यश 10 हजार तास पूर्ण होण्यापुर्वीसुद्धा मिळु शकते ,विशेषत स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10 हजार तास हि पद्धत उपयुक्त ठरू शकते कारण या व्दारे अतिशय कठीण मानल्या जाणार्या या परीक्षांमध्ये यश प्राप्ती निच्छितच होऊ शकते, काही विद्यार्थी जे अतिशय प्रगल्भ आणि अभ्यासू आहेत यांना या पद्धतीमुळे दैदिप्यमान यश मिळू शकते .

  फक्त नोकरीच नाही तर जीवनातील सर्वच महत्वाच्या घटकांसाठी हि पद्धत उपयुक्त आहे,व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी , शरीर सौष्ठव (body building), वैचारिक प्रगल्भता वाढवण्यासाठी नियोजन करून अभ्यास पूर्ण मार्ग निवडून निश्चित ध्येय प्राप्त करता येऊ शकते.

 10 हजार तास चा मंत्र डोळ्यासमोर ठेवुन तुमचे ध्येय निश्चित करा आणि ते ध्येय कसे प्राप्त करायचे याचे नियोजन करा ,स्व:ताची क्षमता ओळख आणि असलेली क्षमता वाढवण्याच्या पर्यंत करा , यश तुमचेच आहे . सर्व धडपडणाऱ्या तरुणांना शुभेच्छा ,

लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा, comment करा ,लेख आवडला तर तुमच्या मित्रांना आणि मैत्रिणींना पाठवा  , तुम्हाला हव्या असलेल्या विषयाचे नाव टाका त्या विषयवार लेख लिहिण्याचा प्रयत्न करेन  




शनिवार, ८ मे, २०२१

ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये ( characteristics of Rural Community / Society in marathi )

ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये 

खरा भारत खेड्यात राहतो अस महात्मा गांधी यांनी म्हटले होते , ते आजही योग्य आहे कारण भारताची मोठी लोकसंख्या आजही खेड्यातच राहते. खेडे किंवा ग्रामीण भाग किंवा गाव म्हणजे 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेली लोक वस्ती जिचा मुख्य आर्थिक स्त्रोत शेती आहे.

ग्रामीण समुदायाची  वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :

१. कमी लोकसंख्या :

 ग्रामीण भाग हा शहरापासून दूर असतो आणि ग्रामीण भागाची लोकसंख्या कमी असते ,वर नमूद केल्या प्रमाणे 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असते अशी वस्ती म्हणजे ग्रामीण भाग ,परंतु सध्याच्या काळात ग्रामीण भागाची लोकसंख्या वाढत आहे अनेक गाव 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले आहेत .महाराष्ट्रात अनेक गावांचे दोन भाग झालेले दिसतात ,पहिला भाग 'जुने  गाव  ' हे गाव मूळ  गाव असते सर्वप्रथम तेथेच  वस्ती झालेला असते  जुने गावात जुने वाडे ,मोठी घरे , कोठारे दिसुन येतात अशी बहुतांश गावे पाण्याच्या स्त्रोताजवळ वसलेली आठ्ळतात नदी, तलाव ,जुनी वहीर जी पूर्ण गावाला पाणी पुरवायची ,या विरुद्ध नवे गाव  हे गाव म्हणजे जुन्या गावाचे विस्तारित आणि आधुनिक रूप असते. नव्याने विकसित झालेले हे गाव जुन्या गावाच्या  परिघावरच असते अशी वस्ती मुख्य गावापासून जाणाऱ्या महामार्ग ,बस स्थानक किंवा इतर महत्वाच्या ठिकाणाजवळ वाढते .
या वस्तीत संयुक्त कुटुंबातून विभक्त झालेला ,गावात नोकरी निम्मित स्थायिक झालेले ,व्यापार करण्याच्या दृष्टीने आलेले लोक स्थायिक होतात .
२. शेती प्रधान :
   ग्रामीण भागाची ओळखच शेती आहे,कारण लोकसंख्या कमी असो किंवा जास्त जी वस्ती शेती वर अवलंबुन असते तिलाच ग्रामीण भाग असे संबोधतात, कारण ग्रामीण भागाची अनेक वैशिष्ट्ये हि शेती प्रधान समुदायातच आठळतात ,लोकसंख्या कमी असेल मात्र लोकवस्तीतील   बहुतांश  लोक कारखान्यात  काम करत असतील तर त्य समुदायास ग्रामीण समुदाय संबोधले जात नाही . उदा . एखाद्या कारखान्यात काम करणारे कामगार कारखान्याभोवती वस्ती निर्माण करतात ,या कारखान्यात काम करणारे लोकं ग्रामीण भागातले असले तरी या वस्तीला ग्रामीण समुदाय संबोधले जात नाही. ग्रामीण भागातील बहुतांश लोकसंख्या शेती करणारी असते किंवा शेतीवर अवलंबून असते 
३.संयुक्त कुटुंब :
संयुक्त  कुटुंब पद्धती  हे ग्रामीण  भागाचे वैशिष्ट्ये आहे,ग्रामीण  भागातील संयुक्त कुटुंब पद्धती या साठी पुरक होती कारण पूर्वी शेतीचे क्षेत्र मोठे असायचे त्यमुळे एकत्रित कुटुंबामुळे आवश्यक तेवढे मनुष्यबळ शेतीच्या कामासाठी उपलब्ध असायचे कारण आज पासून  चार-पाच दशक पूर्वी शेतीचा आकार मोठा होता आणि आधुनिक यंत्र सुद्धा नव्हते  .त्यामुळे  शेतीची कामे वेळखाऊ असायची या साठी  एकत्र कुटुंब पद्धती उपयुक्त ठरायची मात्र सध्या शेतीचे दरडोई क्षेत्र कमी होत आहे  व यांत्रिकीकरण वाढले आहे तसेच आर्थिक उत्पन्नाचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने संयुक्त  कुटुंबांचे प्रमाण कमी होताना दिसते .
४.निसर्ग सानिध्य :
   ग्रामीण भागाचे आपल्या डोळ्यासमोर येणारे चित्र म्हणजे नदी किनारी वसलेले गाव, छोट्या डोंगररांगा ,पशु पक्षी  असे असते.ग्रामीण भाग हा निसर्ग सानिध्यात असतो, शेती प्रधान जीवन शैली मुळे निसर्गावर अवलंबुन असणारा हा लोकसमूह आहे, निसर्गाच्या कृपा आणि अवकृपा या दोन्ही चा ग्रामीण भागावर परिणाम होतो उदा. एखाद्या गावात महापुर आल्यास शेतीचे नुकसान तर होतेच मात्र शेतीची सुपीक मृदा वाहून जाते याचा परिणाम पुढील अनेक वर्ष शेतकऱ्यांना भोगावा लागतो मात्र शहरात महापुर आला किंवा अतिवृष्टी झाली तर १-2 दिवसात जनजीवन विस्कळीत होते नंतर मात्र सुरळीत होते. ग्रामीण जीवनात आता बदल होत आहेत पूर्वी फक्त शेतीच नवे तर अनेक गरजेच्या वस्तु साठी निसर्गावरच अवलंबुन असत आता मात्र आधुनिकीकरण ग्रामीण भागात पोहचले आहे, त्याचा परिणाम ग्रामीण जीवन शैली वर होत आहे.
५. एकजिनसीपणा :
    एकजिनसीपणा म्हजे ग्रामीण भागाची जीवनशैली हि एकाच  प्रकरची आहेत ,यात विविधता नसते . शेतमजुर असो किंवा मोठा शेतकरी त्यांचा दिनक्रम सारखाच असतो, शहरांमध्ये  दिसुन येणारी बहुविध जीवन शैली इथे नसते, कुटुंब,शेती आणि गाव या .त्रिकोनातच त्यांचे जीवन असते.

६. सामाजिक स्तरीकरण :
        ग्रामीण समाज जीवनात सामाजिक स्तरीकरण मोठ्या प्रमाणात आठळते, भारतात हे स्तरीकरण प्रामुख्याने जाती व्यवस्थेच्या स्वरूपात आठळते, ग्रामीण भागात आजही जाती निहाय वस्ती दिसते ,सामाजिक मागासवर्गीय लोकांना आजही योग्य तो सन्मान मिळत नाही, मात्र शिक्षण आणि आधुनिकीकरन या मुळेहळू हळू सामाजिक स्तरीकरण आता लवचिक होत आहे, पूर्वी सारखी कर्मठता राहिली नाही, मात्र ती पूर्ण पणे नष्ट झाली आहे असेही नाही.
७.पायाभुत सुविधांचा अभाव :
   ग्रामीण भागात मुलभूत  पायाभुत सुविधांचा अभाव आढळून येतो, रस्ते,पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा ,शाळा इत्यादी  सुविधा नसतात, ग्रामीण भागात कच्चे रस्ते असतात,काही गावात जाण्यासाठी नदीवर पूल असणे आवश्यक आहे मात्र असे पूल नसतात .त्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर गावाचा  दुसऱ्या गावाशी संपर्क तुटतो,२०१९ च्या आकडेवारी नुसार भारतातील ग्रामीण भागत आजही ८० टक्के लोकांना पण्याचे पाणी नळाव्दारे मिळत नाही तर त्यांना ते पाणी हातपंप,विहीर नदी किंवा सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतावरून आणावे लागते या सारखे अनेक प्रश्न आहेत,पायाभूत सुविधा ह्या ग्रामेण विकासासाठी आवश्यक आहेत 
   

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

केमाल पाशा- आतातुर्क ( तुर्कांचा पिता )- आधुनिक तुर्कस्तान चा जनक (kemal Pasha ,ataturk)

 हुकुमशहा हा शब्द उच्चारल्यावर  डोळ्यासमोर हिटलर ,मुसोलिनी, स्टँलिन यांचे चित्र समोर येते, सध्या किंम जोंग उन हा हुकुमशहा त्याच्या कारनाम्यांमुळे चर्चेत असतो. आजही जगात जवळपास 50 राष्ट्रांमध्ये हुकुमशाही आहे.हुकुमशाही चा अर्थ एकाच व्यक्तीच्या हातात सर्व सत्ता  असणे ,एकाच व्यक्तीच्या हातात सत्ता केंद्रित झाल्याने लोकशाही मूल्यांना थारा नसतो. जे काही निर्णय घ्यायचे ते हुकुमशहा त्याच्या मर्जीने घेतो ,त्याचे चांगले वाईट परिणाम जनतेला भोगावे लागतात.जगातील सर्वच हुकुमशहा हे माथेफिरू आणि क्रूर होते  उदा. हिटलर .  हिटलर ने त्याच्या जादुई वक्तृत्व शैलीने सर्व जर्मन जनतेला प्रभावित केले आणि निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला,नंतर त्याने लोकशाही बरखास्त केली आणि स्वत: च्या हातात सर्व सूत्र घेऊन हुकुमशहा झाला,त्याने जगाला दुसऱ्या महायुद्धात लोटले,ज्यु लोकांवर अमानुष अत्याचार केले.त्याच्या निर्णयामुळे फक्त जर्मन जनताच नाही तर संपूर्ण जग युद्धाने होरपळून गेले ,हिटलर च्या समकालीन असलेले एक व्यक्तिमत्व  जो स्वत: हुकुमशहा होता मात्र त्याला जग आदराने वंदन करते, हुकुमशाह असूनही त्याने जनतेवर प्रेम केले ,राष्ट्र विकासासाठी अहोरात्र मेहनत केली.  देशाचे आधुनिकीकरण  केले असे व्यक्तिमत्व म्हणजे केमाल पाशा उर्फ केमाल अतातुर्क

  बालपण :

     केमाल पाशाचे खरे नाव मुस्तफा होते,  मुस्तफाचा जन्म इ.स. १८८१ मध्ये मेसेडोनियात  झाला , त्याच्या वडिलांचे नाव  अली रेझा व आईचे नाव झुबैदा होते.त्या काळात तुर्कस्तानात आडनाव हि पद्धतच अस्तित्वात नव्हती .  बालपणापासुनच मुस्तफा आक्रमक स्वभावाचा होता हे त्याच्या शाळेतील  वागणुकीवरून कळते,त्याला त्याच्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या विद्यार्थ्यांनी त्रास दिला तर तो त्यांच्या अंगावर धावुन जात असे. शरीराने अशक्त वाटणारा हा मुलगा मानसिक रित्या खूपच सशक्त होता तसेच वरून शांत दिसत असला तरी आक्रमक होता .

शिक्षण :

        केमाल ने  धार्मिक शिक्षण घ्यावे असे त्याच्या आईला वाटत होते मात्र केमालचे धार्मिक शिक्षणात मान लागले नाही,केमालच्या आईने अनेक प्रयत्न केले मात्र केमाल नेहमीच इतर मुलांशी व शिक्षकांशी वाद घालत असे, त्याच्या उद्धट वर्तनामुळे एका शिक्षकाने त्याला जबर शिक्षा केली ,केमालने हि शाळा सुद्धा सोडली.केमालने लष्करी शिक्षण घावे असे मत केमालच्या काकांचे होते,सोलानिका या ठिकाणी लष्करी शाळा होती,मात्र झुबैदा ला हे मान्य नव्हते ,केमालने मात्र या वेळी स्व:तहुन पुढाकार घेतला आणि लष्करी शाळेत प्रवेश कसा मिळतो याची सर्व माहिती मिळवली,प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य होती ,केमालने या परीक्षेत यश मिळवले व त्याचा प्रवेश लष्करी विद्यालयात झाला.

                          या विद्यालयात सुद्धा तो एक उद्धट व मग्रूर विद्यार्थी  विद्यार्थी म्हणुन ओळखला जात होता,मात्र त्याला गणित या विषयात चांगली गती होती, त्यामुळे  गणित शिक्षक त्याच्यावर खुश होते,या शिक्षकाने त्याचे नाव बदलुन केमाल ठेवले कारण त्याचे (शिक्षकाचे ) नाव हि मुस्तफा च होते. केमालचा अर्थ परिपूर्ण असा होतो.भविष्यात त्याने हे नाव सार्थ ठरवले .

कारकिर्द:

केमालचे सैनिकी शिक्षण पूर्ण झाल्याने त्याला ' Captain' चा अधिकृत मिळाला.सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण  झाल्यावर  जबाबदारीच्या पदावर नेमणूक होणे अपेक्षित होते मात्र  महाविद्यालयात असताना केलेल्या चळवळीमुळे तुरुंगवास भोगावा लागला  विशेषत: 'वतन ' या संघटनेत राहून केलेल्या कामगिरीमुळे तुरुंगवास भोगावा लागला,या काळात सर्वच महाविद्यालयात तुर्कस्तानच्या सद्य परिस्थितीवर चर्चा करण्यापासून ते  क्रांती घडवुन आणण्याच्या कात करणाऱ्या अनेक संघटना स्थापन झाल्या होत्या . वतन हि संघटना त्यापैकीच एक होती. केमाल वतन च्या सभांना हजार असायचा ,त्याच्या भाषणांनी आणि लेखनाने प्रभावित केले  होते. अशा संघटनांची माहिती सुलताना पर्यन्त गुप्तहेर खात्यामार्फत पोहचत असे, वतन या संघटनेची माहिती मिळाल्यावर केमाल व अजून तीन यूवक जे सुद्धा Captain च्या हुद्दयावर होते त्यांना हि अटक करण्यात आली. केमालचे तुरुंगात खूप हाल झाले ,अर्धवट शिजलेले आन,भरपूर मारहाण आणि वाईट वागणूक मिळाली.मात्र महाविद्यालयाच्या संचालकाने रदबदली केली,न्यायालयासमोर त्यांनी असा मुद्दा मांडला कि 'अश्या सैनिकी शिक्षण घेतलेल्या तरुणांना तुरुंगात डांबून ठेवण्यापेक्षा त्यांना काहीतरी जबाबदारी देवुन त्यांच्याकडून काम करून घेतले जावे.आणि केमालची नियुक्ती राजधानीपासून दूर असलेल्या सिरीयात दमास्कस येथे वाळवंटी प्रदेशात नियुक्ती केली गेली.

१ नोव्हेंबर,१९२२ रोजी केमालने तुर्कस्तानातील सुलतानशाही संपून तेथे प्रजासत्ताक स्थापन झाल्याचा जाहीरनामा काढला ,परंतु या साठी केमालने खूप कष्ट उपसले होते,अतिशय गंभीर संकटाना तोंड दिले होते, १९०६ ते १९२२ या दीर्घ कालावधीत केमालने आपले कर्तुत्व सिद्ध केले होते,अनेक बंड मोडून काढले होते ते त्याने सुलतान च्या आज्ञेनुसार केले  असले तरी सोबतच तो स्व:तची संघटना स्थापन करून देशात लोकशाही आणण्याचे पर्यंत निरंतर करत होता, परंतु त्याला खरी लोकप्रियता व लोकमान्यता मिळाली ती पहिल्या महायुद्धातील  कामगिरी मुळे, पहिले महायुध्द संपल्यावरसुद्धा ग्रीक ने तुर्कस्तानवर आक्रमण सुरूच ठेवले होते,या काळात सुलतानशाही अतिशय जर्जर अवस्थेला पोहचली होती,लोकांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणारा केमाल हा नायक वाटत होता, केमालाल याच काळात पाशा हि पदवी मिळाली  याच काळात केमालच्या सहकाऱ्यांनी तुर्कस्थानात  लोकशाही स्थापनेचे अयशस्वी प्रयन्त केले,त्यामुळे तुर्कस्तानची परिस्थिती अतिशय विदारक झाली होती,सामान्य जनता युद्ध व आर्थिक ताणाने भरडली जात होती.युद्ध आणि राजकारण या दोन्ही बाजू सांभाळून केमाल तुर्कस्थानचा अध्यक्ष झाला होता.त्याने हळू हळू सर्व अधिकार आपल्या हाती केंद्रित केले त्यामुळे त्याची ओळख हुकुम्सह अशी झाली मात्र केमाल ला आधुनिक तुर्कस्तान घडवायचा होता त्यासाठी त्याने सर्व आव्हाने पेलली.

सामाजिक -धार्मिक-शैक्षणिक सुधारणा 

 केमाल लोकप्रिय असला तरी त्याने धर्माच्या चालीरीती बदलण्याचा आणि त्यात सुधारणा करण्याचा जो प्रयन्त केला तो अतीशय धाडसी होता. आपल्या देशाचे धर्म आणि रूढी हेच खरे शत्रू आहेत,इस्लाम आणि त्याच्या नावाने जपलेल्या कित्येक परंपरा ह्यामुळे तुर्कस्तान अशिक्षित व आर्थिक मागासलेला आहे असे केमाल चे पक्के मत होते .देशाची प्रगती कार्याची असेल तर सुरवात धर्म सुधारणे पासून करावी लागेल हे त्याने पक्के केले.त्यासाठी त्याने लोकांचा रोष पत्करला .

  • सर्व प्रथम त्याने ३ मार्च १९२४ रोजी खिलापत बरखास्त केली. तुर्कस्तानचा खलिफा हा जगातील सर्व मुस्लीमांचा धर्मगुरू होता. खलिफा हा धर्मप्रमुख व शासन प्रमुख असे , पहिल्या महायुद्धात तुर्कस्थानाचे तुकडे करण्याचा इंग्लंड ,फ्रांस व इटली चा डाव होता त्या विरुद्ध भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली होती,म्हणजे ज्या खलिफा पदाच्या संरक्षणासाठी भारतात चळवळ सुरु झाली होती त्याच खलिफा पदाचा शेवट केमाल ने केली ,हा धर्मनिष्ठ लोकांसाठी खूप मोठा धक्का होता.त्याने शिक्षण साठी धर्मग्रंथ पाया असणे केमालला मान्य नव्हते.तुर्कस्तान मध्ये धार्मिक स्वरूपाच्या तंट्या सोबतच विवाह,घटस्फोट इत्यादी वैयक्तिक वाद सुद्धा धार्मिक न्यायालयात न्यावे लागत होते ,केमालाने कायदे करून हे सर्व पद्धत बंद केली.
  • दरवेशी हे एक प्रकारचे पंथ होते,मात्र या पंथात हि उपपंथ होते कारण प्रत्येक दरवेशी संघाचे प्रार्थना करण्याचे मार्ग वेगवेगळे होते, मंत्र-तंत्र नृत्यप्रकार जादुटोने इत्यादी मार्ग वापरून आजार बरे करणे ,धन मिळवुन देण्याच्या भूलथापा देत.अडाणी जनता अश्या भूलथाप्पांना बळी पडत होते.इस्लामच्या नावाने राजकारण करत ,सर्वच दरवेशी संघ आपण कुराणनिष्ठ आहोत अस सांगत याच दरम्यान कुर्द समुदायाने उठाव केला या उठावांवर दरवेशी संघाचा प्रभाव होता ,कुर्दांच्या बंडाच्या निमित्ताने केमाल ने या संघांवर बंदी घातली त्यांची मालमत्ता सरकारजमा  केली . केमाल हा द्रष्टा नेता होता त्याने चेटूक ,मंत्रसिद्धी ,गंडे दोरे भविष्यकथन हे प्रकार बेकायदा ठरवले , ते साल होते १९२५ आणि भारतात अजूनही हे प्रकार सुरु आहेत .महाराष्ट्रात जादूटोणा प्रतिबंध कायदा लागू करण्यासाठी  २०१३ साल उजाडले .या वरून आपल्या लक्षात येते कि कमाल किती द्रष्टा व पुरोगामी विचारांचा नेता होता,त्याने त्या काळात जे केले ते खूप धाडस होते तेच ते सुद्धा तुर्कस्तान या देशात जेथे इस्लाम चे कट्टर अनुयायी होते.
  • फेझ टोपी बर बंदी . फेझ हि तुर्कांची पारंपारिक ओळख होती . केमालला मात्र फेझ टोपी मागसल्या पानाचे लक्षण वाते,तुर्की  लोकांना फेझ  आपल्या संस्कृतीचे आणि श्रेष्ठतेचे प्रतिक वाटत होते मात्र केमाल ला फेझ टोपी धर्मवेड्या संस्कृतीचे प्रतिक वाटायचे .


फेझ टोपी 

           केमालने फेझ टोपी ऐवजी हॅट वापरण्याची सक्ती केली ,वरवर हा प्रकार निरर्थक वाटत असला तरी या मागे केमालचा तुर्कस्तानच्या लोकांच्या पारंपारिक मानसिकतेवर प्रहार करण्याचा प्रयन्त होता .मात्र त्याने हॅट वापरण्याची सक्ती करण्यामागे वेगळे कारण  लोकांना सांगितले ते म्हणजे हॅट मुळे सूर्यप्रकाशापासून रक्षण होते ,तसेच फेझ हि टोपी मूळ ग्रीक लोकांची आहे तुर्कांची नाही तसेच या टोप्या तुर्कस्तानात तयार होत नव्हत्या तर ऑस्ट्रियात तयार होत होत्या .केमालने स्वत : हॅट वापरायला सुरवात केली ,शरीर रक्षक व सैनिकांना सुद्धा हॅट वापरायला लावली हळू हळू कायद्याव्दारे संपूर्ण राष्ट्रात अंमलबजावणी केली. 
स्त्रीमुक्ती 
केमालचे  स्त्री मुक्ती विषयक विचार काळाच्या पुढे तसेच क्रांतिकारक वाटावे इतके प्रभावी होते, कोणत्याच धर्माने स्त्रियांना समान अधिकार दिले नव्हते.त्यामुळे स्त्री मुक्तीचे जे विचार केमालने मांडले व अंमलबजावणीत आणले ते काळाच्या पुढे होते. त्या काळात प्रगत व पुरोगामी असणाऱ्या किंवा वाटणाऱ्या देशात म्हणजेच इंग्लंड तसेच इतर ख्रिश्चन राष्ट्र सुद्धा स्त्रीयांना समान अधिकार देत नव्हते. केमालने स्त्री मुक्तीचे कार्य स्व:त च्या कृतीतून दाखवून दिले ,१९२३ मध्ये केमाल ने लतीफ नावच्या स्त्री शी लग्न केले. तिला घेवून तो अनेक ठिकाणी हिंडला त्याने तिला बुरखा घालू दिला नाही,वेगवेगळ्या पश्चिमात्य पोशाखात तिला मिरवले स्त्री पुरुषांना एकत्र आणुन स्त्रीयांना पुरुषांशी बोलायला आणि नाचायला लावले . १७ फेब्रुवारी १९२६ मध्ये त्याने नवीन नागरी कायदा समंत केला, हा कायदा स्वित्झर्लंड मधील कायद्यावर आधारित होते.इस्लामच्या स्थापनेपासून मान्य असलेले बहुपत्नीत्व संपवण्यात आले होते.स्त्री ला मतदानाचा हक्क मिळाला , घटस्फोट घेणे पुरुषांना अवघड झाले कारण स्त्री ला आता पोटगीचा अधिकार मिळाला.१९३५ मध्ये १७ स्त्रिया लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या . हे सर्व काळाच्या पुढे होते .त्याने या सुधारणा करताना मोठे धाडस  केले, लोकांचा विरोध पत्करला  पण सुधारणा थांबविल्या नाहीत .
इ.स. १९२७ च्या नोव्हेंबरमध्ये निवडणुका होऊन केमाल पुन्हा अध्यक्ष झाला या वेळी त्याने इस्लाम तुर्की प्रजासत्ताकाचा धर्म आहे हे कलम रद्द केले . आजही जगात अनेक राष्ट्रांचा अधिकृत धर्म आहे ,पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र आहे.युरोपियन राष्ट्रे ख्रिश्चन आहेत.भारत धर्म निरपेक्ष आहे तसाच प्रयन्त केमालने  केला त्याने तुर्कस्तानचा इस्लामिक राष्ट्र म्हणून नाही तर धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र असा बदल केला ,ज्या काळात धर्म आंधळे पण कळसावर होता त्या काळात केमाल ने केलेला बदल  त्याच्या आधुनिकतेची साक्ष देतो. 
तुर्कस्तान ची मुख्य भाषा तुर्की च होती .तुर्की भाषा बहुसंख्य लोकांची भाषा होती मात्र या भाषेला लिपी नव्हती त्यामुळे या भाषेचा प्रसार होत नव्हता . तुर्की भाषा हि अरबी भाषेतच लिहिली जात होती . अरबी भाषेची कमतरता म्हणजे एकाच अक्षराचे  अनेक उच्चार होत ,त्यमुळे अरबी भाषेतील लिहलेली तुर्की वाचणे अवघड काम होते. रशियाने ज्या प्रकारे लिपीत सुधारणा घडवून आणली त्याच प्रकारे केमाल ने तुर्की भाषा हि रोमन लिपीत लिहली जावी असा कायदा केला .
केमालने स्व:त रोमन लिपी ग्रामीण भागात जाऊन शिकवली 

रोमन लिपी प्रसार करण्याचे काम त्याने स्व:त अनेक गावात जाऊन केले. तेथील हुशार तरुणांना शिकवले व त्यांना इतर लोकांना शिकवण्यासाठी प्रोस्ताहित केले. त्यने या लिपीला रोमन लिपी न संबोधता 'तुर्की' लिपी संबोधले कारण तुर्की लिपी हे संबोधन देशाभिमान प्रकट करत होते.

केमाल अतातुर्क झाला 
     
केमाल तुर्कस्तानात आडनाव लावणे हि पद्धत अस्तित्वात नव्हती . केमाल ला सुरवातील गाझी  संबोधत कारण त्याने युद्धात विजय मिळवले होये . गाझी चा अर्थ ख्रिश्चनाची कत्तल करणारा असा होता, पुढे त्याला पाशा मान्यता दर्शक पदवी दिली गेली , राजकारणात प्रतिष्ठा प्राप्त करणाऱ्या व्यक्तीच्या नावापुढे पाशा हि पदवी जोडत .
तुर्की मुसलमान संस्कृतीत आडनाव लावण्याची पद्धत नव्हती त्यामुळे सामाजिक व्यवहारात गैरसोय होत असे. आडनाव लावण्याची सुरवात केमाल ने स्व:त  पासून केली . त्याने पाशा किंवा गाझी पदव्या माझ्या नावापुढे लावू नयेत असा हुकुम केला तसेच सर्व लहान मोठ्या ,गरीब श्रीमंत सुशिक्षित - अशिक्षित लोकांच्या नावापुढे  मिस्टर,मिस या अर्थाचे तुर्की शब्द नावापुढे लावायचे होते जसे भारतात श्री,श्रीमती हे शब्द इंग्लिश भाषेत रुपांतर करून वापरतात. केमालने स्व:त साठी आतातुर्क ( तुर्कस्तानचा जनक ) हे उपनाम धारण केले, इ.स. १९३४ मध्ये केमालने आपल्याला आतातुर्क संबोधले जावे असे सांगितले.
                   जगात जे हुकुमशहा झाले त्यांनी लोकशाही चा गळा घोटला मात्र केमाल ने लोकशाहीचे बळकटीकरण करण्यासाठी हुकुमशहा झाला. तो एक तर्कशुद्ध रीतीने आधुनिक जगाच्या सोबत राहणारा नेता होता त्याला तुर्कस्तानचे आधुनिकीकरण घडवून आणायचे होते ते त्याने केले,त्यासाठी त्याने त्याला योग्य वाटेल त्या मार्गाचा अवलंब केला . १० नोव्हेंबर,१९३८ मध्ये केमाल चा मृत्यू झाला .परंतु केमालने आखून दिलेल्या मार्गावरच तुर्कस्तान चालत होता .मात्र मागच्या दशकातील काही घडमोडी दाखवतात कि तुर्कस्तान पुन्हा धर्माधिष्ठित राष्ट्र्कडे वाटचाल करत आहे .त्या विषयी पुढच्या लेखात चर्चा करू .





5 minutes for English learning

  Daily Dose of English

सर्वाधिक वाचले गेलेले पोस्ट